आतकंवादाला आता ACT OF WAR मानला जाईल, भारताचा सर्वात मोठा निर्णय.

भारताने आतकंवादा विरोधात एक अत्यंत महत्त्वाचा आणि कठोर निर्णय घेतला आहे! पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारत सरकार आता अधिक आक्रमक भूमिका घेणार आहे, हे स्पष्ट दिसत आहे. यापुढे कोणताही आतंकवादी हल्ला म्हणजे भारतावर केलेले युद्ध ( ACT OF WAR) समजले जाईल आणि त्याला त्याच पद्धतीने प्रत्युत्तर दिले जाईल, ही खरंच खूप मोठी घोषणा आहे.

भारताचा आतकंवादा विरोधात कठोर पवित्रा

यापूर्वी आपण आतंकवादी हल्ल्यांना आणि पाकिस्तानच्या लष्कराच्या हल्ल्यांना वेगळ्या दृष्टिकोनातून पाहत होतो. पण आता, आतंकवाद्यांना त्यांच्या कृत्यांची मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. पाकिस्तानच्या मदतीने येणारे आतंकवादी असोत किंवा इतर कोणी, जर त्यांनी भारतीय भूमीवर हल्ला केला, तर त्याला थेट युद्ध ( ACT OF WAR) मानून जशास तसे उत्तर देण्याचा निर्धार भारताने केला आहे.

निवृत्त मेजर जनरल अनिल बाम यांनीही या निर्णयाचं स्वागत केलं आहे. ते म्हणतात, “आतंकवादी कृत्य हे देशाविरुद्ध केलेले कृत्य आहे आणि ते युद्धजन्यच असते. भारताने हा निर्णय घ्यायला उशीर केला, पण घेतला हे महत्त्वाचं आहे. आता शत्रू राष्ट्राकडून किंवा , आतंकवाद्यांकडून कोणतीही कारवाई झाली, तर त्याला युद्ध ( ACT OF WAR) समजूनच उत्तर मिळेल.” त्यांचं हे म्हणणं अगदी खरं आहे. भारताने आतापर्यंत अनेक आतंकवादी हल्ले सहन केले आहेत, पण आता ही भूमिका देशाला अधिक सुरक्षितता देणारी ठरू शकते.

इतर देशांच्या प्रतिक्रियेची गरज नाही

जनरल बाम पुढे असंही म्हणाले की, भारताने इतर देशांच्या प्रतिक्रियांकडे लक्ष देण्याची गरज नाही. कारण आतंकवादाचा सामना तर भारताला करायचा आहे आणि कोणत्याही प्रतिक्रियेला उत्तर देण्यासाठी भारत पूर्णपणे सक्षम आहे. हे आत्मविश्वासपूर्ण विधान भारताच्या कणखर भूमिकेची साक्ष देतं.

उच्च पदस्थ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भविष्यात होणारा कोणताही आतंकवादी हल्ला हा भारतावर केलेली युद्ध कारवाई मानली जाईल आणि त्यानुसारच प्रत्युत्तर दिलं जाईल. भारत आता आतंकवादी हल्ल्याला युद्धाची ( ACT OF WAR) कृती समजून उत्तर देणार, हे निश्चित आहे.

याच पार्श्वभूमीवर, भारताच्या परराष्ट्र मंत्रालय आणि संरक्षण दलाची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे, हे देखील महत्त्वाचं आहे. भारत वारंवार पाकिस्तानचा खोटेपणा जगासमोर आणत आहे. ऑपरेशन सिंदूर (OPERATION SINDOOR) नंतर पाकिस्तान अधिक बिथरला आहे आणि त्यामुळेच ड्रोन आणि मिसाईल हल्ले करत आहे. मात्र, आपल्या संरक्षण दलांनी त्यांचे हे प्रयत्न यशस्वी होऊ दिलेले नाहीत, ही खूप चांगली गोष्ट आहे.

आतकंवादाविरोधात निर्णायक पाऊल

एकंदरीत, भारताचा हा निर्णय आतकंवादाविरोधात एक निर्णायक आणि प्रभावी पाऊल ठरू शकतो. आता गरज आहे ती या निर्णयाची कठोर अंमलबजावणी करण्याची, जेणेकरून आतंकवाद्यांनाआणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना एक स्पष्ट आणि कठोर संदेश जाईल. भारताच्या या भूमिकेमुळे देशाची सुरक्षा अधिक मजबूत होईल, यात शंका नाही.

Leave a Comment