Siddhi News: लखनौ – आयपीएल 2025 च्या 65 व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायजर्स हैदराबाद (RCB vs SRH 2025) हे दोन संघ आमनेसामने आले. या सामन्याच्या तोंडावरच आरसीबीला मोठा धक्का बसला आहे. संघात कर्णधारपदात बदल करण्यात आला असून महाराष्ट्राच्या जितेश शर्माकडे नेतृत्व सोपवण्यात आलं आहे.
हैदराबादसारख्या ताकदवान संघाविरुद्ध आरसीबीचा हा सामना अत्यंत निर्णायक मानला जातोय. प्लेऑफमध्ये जागा निश्चित असूनही, टॉप 2 मध्ये स्थान मिळवण्यासाठी हा सामना जिंकणं आरसीबीसाठी गरजेचं आहे. एकाना स्टेडियमवर रंगलेल्या या लढतीकडे साऱ्या चाहत्यांचं लक्ष लागून आहे.
RCB vs SRH 2025 च्या सामन्यासाठी जितेश कॅप्टन
देशांतर्गत क्रिकेटमध्ये विदर्भासाठी खेळणारा आणि आयपीएलमध्ये आपलं नाव कमावलेला जितेश शर्मा आज पहिल्यांदाच आरसीबीसाठी कर्णधार म्हणून मैदानात उतरला. रजत पाटीदारच्या दुखापतीमुळे हा निर्णय घेण्यात आला. टॉस जिंकताच जितेशने पहिल्यांदाच निर्णय घेण्याचा आत्मविश्वास दाखवत बॉलिंगचा पर्याय निवडला.
RCB vs SRH 2025 संघात बदल – दोन्ही टीममध्ये हालचाल
आरसीबीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एकच बदल करण्यात आला आहे. देवदत्त पडीक्कलच्या जागी मयंक अग्रवालला संधी देण्यात आली आहे. तर पाटीदार इमपॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात उतरणार आहे. हैदराबादने मात्र तीन मोठे बदल करत आक्रमकतेचा संकेत दिला. ट्रेव्हिस हेडचं दमदार पुनरागमन झालं असून, जयदेव उनाडकट आणि अभिनव मनोहरदेखील संघात परतले आहेत.
महाराष्ट्राचा अभिमान – तिसरा कर्णधार
जितेश शर्मा हा आयपीएलच्या 18 व्या मोसमात महाराष्ट्राकडून नेतृत्व करणारा तिसरा खेळाडू ठरला आहे. याआधी अजिंक्य रहाणे (केकेआर) आणि ऋतुराज गायकवाड (सीएसके) यांनी कर्णधारपद भूषवलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रासाठी ही अभिमानास्पद गोष्ट मानली जात आहे.
आरसीबीसाठी महत्त्वाचा क्षण
सनरायजर्स हैदराबादचं स्पर्धेतील आव्हान संपलं असलं तरी आरसीबीसाठी ही लढत अत्यंत महत्त्वाची आहे. विजय मिळवून पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी पोहचण्याचा हा सुवर्णसंधी आहे. आता जितेश शर्माच्या कर्णधारपदात संघाला विजय मिळतो का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.