भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या शस्त्रसंधी (सीजफायर) नंतर भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर ‘Operation Sindoor’ संदर्भात एक महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद घेतली, ज्यात अनेक धक्कादायक माहिती उजेडात आली.
🛡️ आमची लढाई दहशतवाद्यांविरोधात आहे, पाक लष्कराविरोधात नाही – एअर मार्शल एके भारती |
🚀 स्वदेशी वायू संरक्षण प्रणाली ‘आकाश’ उत्तम कामगिरी करत आहे – भारतीय सेना |
भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाल्यानंतर आज भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर ‘Operation Sindoor’ संदर्भात पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली.
ऑपरेशन सिंदूर ‘Operation Sindoor ‘ संदर्भात तीनही दलांचे महासंचालक समोर आले आणि त्यांनी काही महत्त्वाचे खुलासे केले. याआधी वायुदलाने कराचीतील पाकिस्तानी लष्करी तळावर हल्ला केल्याची माहिती दिली होती.
ऑपरेशन सिंदूर ‘Operation Sindoor’ मध्ये चीनची मिसाइल भारतीय जवानांनी धुळीस मिळवली.
भारतीय लष्कराने सांगितले की, आम्ही चीनची एक मिसाइलही नष्ट केली आहे. लष्कराने सांगितले की, पीएल-15 एअर-टू-एअर मिसाइलचा मलबा सापडला, जी चीन निर्मित आहे आणि जी पाकिस्तानने भारतावर हल्ला करताना वापरली होती.
पाकिस्तानच्या लष्कराने दहशतवाद्यांना साथ.
भारतीय हवाई दलाचे एअर मार्शल एके भारती यांनी स्पष्टपणे सांगितले की, “या वेळेसही आपण पाहिलं की पाकिस्तानच्या लष्कराने थेट दहशतवाद्यांना साथ दिली. त्यांनी भारतावर हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यांचा वापर केला, त्यामुळे आपल्याला प्रत्युत्तर द्यावं लागलं.
“आपली लढाई ही दहशतवाद्यांविरोधात आणि त्यांना मदत करणारया यंत्रणेविरुद्ध आहे – पाकिस्तानच्या लष्कराविरुद्ध नाही,” असंही त्यांनी ठामपणे सांगितलं.
ते पुढे म्हणाले, “आपली शस्त्रास्त्रं वेळेवर आणि योग्य रीतीने वापरली गेली. आपल्या देशात तयार झालेली ‘आकाश’ ही वायू संरक्षण प्रणाली उत्कृष्ट कामगिरी करत आहे.
सेनेचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी नमूद केलं की, “गेल्या काही वर्षांत दहशतवादी हल्ल्यांचा स्वरूप बदललं आहे. आता थेट निष्पाप नागरिकांवर हल्ले केले जात आहेत.
सेनेने स्पष्ट केलं आहे की, “आम्ही कुठल्याही पुढील मोहिमेसाठी पूर्णपणे सज्ज आहोत.”
आपली लढाई दहशतवाद्यांविरोधात आहे, पाक लष्कराविरोधात नाही.
सेनेनं घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं की, “आमचं ध्येय फक्त आणि फक्त दहशतवाद्यांचा नायनाट करणं आहे, आमचा उद्देश पाकिस्तानच्या लष्कराशी लढणं नव्हता.”
सेनेनं हेही सांगितलं की, “आपले सर्व एअरबेस पूर्वीप्रमाणे पूर्ण क्षमतेनं कार्यरत आहेत आणि आम्ही कुठल्याही नव्या मोहिमेसाठी पूर्णतः सज्ज आहोत.”
पाकिस्तानच्या पापाचा घडा भरून गेला होता.
डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले, “गेल्या काही वर्षांत दहशतवादी कारवायांचं स्वरूपच बदललं आहे. निष्पाप नागरिकांवर थेट हल्ले होऊ लागले होते. विशेषतः पहलगाममध्ये झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या पापाचा घडा भरून गेला होता.”
ते पुढे म्हणाले, “म्हणूनच आम्ही दहशतवाद्यांचे तळ लक्ष्य केले. ही कारवाई अत्यंत आवश्यक होती आणि त्यासाठी आम्ही पूर्ण तयारी करूनच पुढे गेलो.
भारतीय लष्कराचा हा निर्धार आणि त्यांनी दिलेली माहिती खरंच महत्त्वपूर्ण आहे. यातून हे स्पष्ट होतं की भारत आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो आणि दहशतवाद्यांना त्यांच्या कृत्यांची किंमत चुकवावीच लागेल!
याचा मजकूर खूप महत्त्वाचा आहे. भारतीय लष्कराची ही कारवाई दहशतवाद्यांविरुद्ध असल्याचे स्पष्टपणे दिसते. त्यांचा हा निर्धार आणि धैर्य प्रशंसनीय आहे. पाकिस्तानच्या लष्कराच्या भूमिकेबद्दलही यातून काही सूचना मिळतात. आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी अशा कारवाया आवश्यक आहेत का? भारतीय लष्कराच्या या कारवाईमुळे दहशतवाद्यांच्या कृत्यांवर कसा परिणाम होईल? या संदर्भात आपल्या नागरिकांच्या सुरक्षेबद्दल आणखी काय उपाय योजले जाऊ शकतात?